Sunday, November 1, 2015

सुधागड, ता. सुधागड, जि. रायगड

संभाजी राजांविरुद्ध म्हणजेच स्वराज्याविरुद्ध झालेली कारस्थाने, त्या बावळटांनी औरंगजेबाशी बंड करुन संभाजी राजांशी मैत्री करण्यासाठी आलेल्या औरंगपुत्र अकबर याला सह्यांनिशी लिहीलेले राष्ट्रद्रोही पत्र आणि त्यानंतर संभाजी राजांनी या द्रोह्यांना दिलेल्या यथोचित शिक्षा...
ज्या दिवशी मला खरे शंभूराजे समजले त्या दिवसापासून या सर्व घटना आणि त्या ज्या भुमित घडल्या तो सुधागड माझ्या प्रचंड औत्सु्क्याचा, श्रद्धेचा विषय. दोन चार दिवसांपूर्वी ठरल्या नियोजनानुसार ही तिर्थयात्रा केली. पावन झालो.
नाईट ट्रेक केला. संध्याकाळी कामं उरकून निघालो. रात्री गड चढलो. निम्मा किल्ला रात्री फिरलो लखलखत्या चांदण्यात. मग मुक्कामाच्या ठिकाणी गडावरील पंतसचिवांच्या वाड्याशेजारी. सकाळी दुर्गभ्रमण करुन साडे नऊ दहाला परतीचा प्रवास सुरु. राजधानीसाठी ज्या काही किल्ल्यांचा विचार झाला त्यात सुधागडचा नंबर वरचा होता. शिवरायांबरोबरच शंभूराजांच्या कारकिर्दीतही या किल्ल्याचे महत्वाचे योगदान. आजही हा किल्ला लाखोंचा पोशिंदा आहे.





















काही गोष्टी मुद्दाम ठेवल्यात पहायच्या... तुम्ही उद्या चल म्हटले तर यायला थोडं रिजनेबल कारण पाहिजे ना... wink emotico

n

No comments:

Post a Comment