आज परत ट्रेकिंगला का ? हातातलं युगंधर बाजूला ठेवून त्यानं मला विचारलं.
- हो...
- हो...
काम धाम करता काही, की नुसतच फिरता ? आता त्यानं माझ्या बुटाला हात घातला.
- करतो ना. फिरण्यापुरतं कमवतो आणि फिरतो.
- करतो ना. फिरण्यापुरतं कमवतो आणि फिरतो.
मला पण लय आवड व्हती हो.... इनर सोल बदलता बदलता गडी बोलायला लागला...
चौथीला होतो तेव्हा माझा सगळा इतिहास पाठ होता. कुठलाबी गडकोट विचारा. तव्हाच ठरवल्यालं शिवरायाचं सगळं किल्लं बघायचं. पण चौथीत शाळा सुटली. आणि काम पडलं. मग संसार पोरं बाळं. फिरायचं राहून गेलं सगळं. आता चार पाच वर्षात शेवटच्या पोराचं मार्गी लागल. मग मी सगळे किल्ले फिरणार...
युगंधरकडे बोट दाखवल्यावर म्हटला... हातातलं काम संपल्यावर इकडं तिकडं बघत टाईमपास करत बसण्यापेक्षा पुस्तकांत डोकं घालून बसतो. ही आता चौथ्यांदा वाचून होत आली तेव्हा कुठे तिचे सर्व संदर्भ डोक्यात घुसायला लागलेत.
लेस बदलल्यावर म्हटला... ही घेवून जा तुमच्यासोबत जुनी लेस. मी डिस्कव्हरीवर पाहिलं, खूप कामाला येवू शक्ते ती तुमच्या. ८० रूपये झाले म्हटला. १०० दिल्यावर ४० परत दिले. म्हणे असू द्या हो... माझं स्वप्न तुम्ही जगताय. मग मी २० रुपये कमी नाय घेवू शकत काय...
इथं प्रत्येक ह्दयात आस आहे, शिवबाचा ध्यास आहे.
आणि त्या वाटेवर चालणारांना, लक्ष हातांची साथ आहे.
आणि त्या वाटेवर चालणारांना, लक्ष हातांची साथ आहे.
उगच येडी म्हतारी जनता काशी चारधाम ला नेण्यापेक्षा, ह्दयात आग ठेवून सक्षम नवी पिढी घडविण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी सोडून झटलेल्या जुन्या पिढीची कड कोट किल्ल्यांच्या वारीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यांना सह्याद्री सातपुड्याशी जोडण्यासाठी एखाद्या संस्थेची गरज आहे. असं उगाच वाटून गेलं.
@ गांधी भवन कॉर्नर, कोथरुड

No comments:
Post a Comment